Kusumagraj Kavita are heart touching marathi kavita | poems kusumagraj. This marathi poems are best lines to explain in form of marathi kavita. kusumagraj kavita taken as marathi status on life
Kusumagraj – Vishnu Vaman Shirwadkar (विष्णू वामन शिरवाडकर): (Born: 27 February 1912, Died: 10 March 1999) The famous Marathi poet in Indian literature. His play ‘Natsamrat’ has major role in Marathi literature. He was born in Pune, Maharashtra.
kusumagraj famous marathi kavita | poems are kana, shanpan, prem and many more
शहाणपण
इथे वाटतं प्रत्येकाला
आपणच फक्त शहाणे
झाल्या जरी हातून चुका
तरी करतात बहाणे
वाईट नसतं कोणालाही
मनापासून चाहणे
मात्र वाईट असतं कोणालाही
पाण्यामध्ये पहाणे
जरूरी असतं प्रत्यकाने
वकुब ओळखून राहाणे
नशिबी येतं नाहीतर
प्रवाह पतित वहाणे
__कुसुमाग्रज
Marathi kavita kusumagraj ...
तो क्षण निघून गेला अन मी पाहतच राहीलो…….
एकदा एका डोळे मध्यल्या अश्रुने दुस-याला विचारले……
‘ए का रे आपण असे
ना रंग, ना रूप,
नेहमीच मात्र चिडीचुप,
आनंद झाला तरी डोळ्यातुन बाहेर,
दु:खाच्या प्रसंगीही दुराव्याचा अहेर,
कोणीच कसे थांबवत नाही आपल्याला,
किनारा ही साधा नाही या पापण्याला…………
दुस-यालाही जरा मग प्रश्न पडला,
खुप विचार करून मग तो बोलला,
रंग-रूप नसला तरीही,
चिडीचुप असलो जरीही,
आधार ठेवतो भावनांचा,
आदर राखतो वचनांचा,
सान्त्वनांचे बोल आपणच ,
अंतरीही खोल आपणच ,
सुखात आपले येणे व्यक्तिपरत्वे,
दु:खाच्या प्रसंगी आपलेच मात्र महत्व,
आपल्याला कोणी नाही थांबवु शकत,
बंधनात नाही कोणी बांधु शकत,
उद्रेक आपल्या मनातील वेदनांचा,
नाजुक धागा वचनातील बंधनांचा,
भावबंध ह्र्दयातील स्पंदनांचा,
स्वरबद्ध झंकार तनातील स्पंदनांचा ,
म्हणुनच,
आपले बाहेर पड़णे भाग आहे,
आपल्यामुळेच आज हे जग उभे आहे.
अशीच आपली ही कहाणी………
ऐकून अश्रुंची ही वाणी
अश्रुच्याच डोळ्यांत हळुच आले पाणी……..
__कुसुमाग्रज
Kana kusumagraj kavita
ओळखलत का सर् मला पावसात आला कोणी
कपडे होते कर्दमलेले केसावरति पाणी
क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहुन
गंगामाई पाहुणि आलि गेली घरटयात राहुन
माहेरवाशिण पोरिसारखी चार भिंतित नाचली
मोकळ्या हाती जाईल कशी बायको माञ वाचली
भिंत खचली चूल वीझली होते नव्हते नेले
प्रसाद म्हणुन पापण्यांमधे पाणी माञ ठेवले
कारभारणीला घेऊण संगे सर आता लढतो आहे
पडकी भिंत बान्धतो आहे चिखल गाळ काढतो आहे
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला
मोडून पडला संसार तरि मोडला नाहि कणा
पाठीवरती हात ठेउन नुसते लढ म्हणा.
_कुसुमाग्रज
प्रेम
पुरे झाले चंद्रसूर्य
पुऱ्या झाल्या तारा
पुरे झाले नदीनाले
पुरे झाला वारा
मोरासारखा छाती काढून उभा रहा
जाळासारखा नजरेत नजर बांधून पहा
सांग तिला तुझ्या मिठीत
स्वर्ग आहे सारा
शेवाळलेले शब्द आणिक
यमकछंद करतील काय?
डांबरी सडकेवर श्रावण
इंद्रधनू बांधील काय?
उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत रहाशील फिरत
जास्तीत जास्त बारा महिने बाई बसेल झुरत
नंतर तुला लगिनचिठ्ठी
आल्याशिवाय राहील काय?
म्हणून म्हणतो जागा हो
जाण्यापूर्वी वेळ
प्रेम नाही अक्षरांच्या
भातुकलीचा खेळ
प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं
प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत रहाणं
प्रेम कर भिल्लासारखं
बाणावरती खोचलेलं
मातीमध्ये उगवूनसुद्धा
मेघापर्यंत पोचलेलं
शव्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस
बुरुजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस
उधळून दे तुफान सगळं
काळजामध्ये साचलेलं
प्रेम कर भिल्लासारखं
बाणावरती खोचलेलं
__कुसुमाग्रज
This marathi poem | kavita by Kusumagraj
Also check
0 comments: