Marathi prem kavita is the best categories in marathi poems,

Prem he asech aste

प्रेम हे असच असतं,
करतांना ते कळत नसतं आणि
केल्यावर ते उमगत नसतं,
उमगल तरी समजत नसतं पण,
आपल वेड मन आपलच ऐकत नसतं…
ते फक्त त्या दोन जीवांनाच माहित असतं,
लोक म्हणतात काय असतं प्रेमात,
पण मी म्हणतो करून बघा एकदा
काय नसतं प्रेमात…
प्रेम हे सांगून होत नसतं,
मित्रानो ते झाल्यावरच कळत असतं,
दोन जीवांना जोडणारा तो एक नाजूक धागा असतो,
दोन हृदयांची स्पंदने एकमेकांना ऐकवणारा एक भाव असतो…
प्रेमाची परिभाषाच खूप वेगळी असते,
दोन शब्दात ती कधीच समजत नसते,
म्हणूनच प्रेम हे असच असतं,
पण ते खूप खूप सुंदर असतं…!








Virah Kavita Marathi
Prem Kavita
तुझ्या शिवाय मी जगायचं कस हे शिकवुन जा
जाता जाता या डोळ्यांना अश्रू न ढाळता जगायचं कस हे शिकवून जा
तुझ्या शिवाय रोज मरणाला सामोर जान शिकवून जा
तुझ्या शिवाय दोन घास आनंदाने कोण भरवणार
ते दोन घास तुझ्या शिवाय कशे खायचे ते शिकवून जा
तुझ्या शिवाय या जगा समोर जगायचं कस ते शिकवून जा
तू जाण्याचं दुःख असून ही नेहमी हसरा चेहरा कसा ठेऊ ते शिकवून जा
तुझ्या शिवाय मी जगायचं कस हे शिकवून जा…!


Lagna Kavita Marathi
Lagna Kavita
लग्न म्हणजे काय असतं?
तो कितीही वेंधळा असला तरी त्याला सांभाळून घ्यायचं असतं,
तिने कसाही स्वयंपाक केला तरी त्याला “मस्त” म्हणायचं असतं…
लग्न म्हणजे काय असतं?
क्रिकेटमध्ये कितीही इंटरेस्ट नसला तरी त्याच्यासाठी ते एन्जॉय करायचं असतं,
बागेत जायचा कंटाळा आला असला तरी तिच्यासोबत आनंदाने जायचं असतं…
लग्न म्हणजे काय असतं?
तो कितीही “म्हातारा” झाला तरी त्याला चिरतरुण भासवायचं असतं,
“मी जाड झालेय का?” या वाक्याला कधीही “हो” म्हणायचं नसतं…
लग्न म्हणजे काय असतं?
दोन्ही घराच्या नात्यांना आपुलकीने जपायचं असतं,
वेळप्रसंगी आपल्या इच्छांना हसत हसत विसरायचं असतं…
लग्न म्हणजे काय असतं?
छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये केलेलं कॉम्प्रोमाईज असतं,
कारण “म्हातारपणी एकमेकांना साथ देऊ” असं एकमेकाला केलेलं प्रॉमिस असतं…




Breakup Mhanje Kay Aste Kavita
Prem Kavita
ब्रेकअप म्हणजे नक्की काय असतं?
ज्याला मराठीत प्रेम भंग म्हणतात तेच असतं,
जुळलेले अनुबंध तोडणे असतं?
कि कधी ते जूळलेचं नव्हते हे उमगणं असतं…
कुणाचा तरी निरर्थक हट्ट असतो?
कि दोघांनी मिळून घेतलेला कठोर निर्णय असतो,
त्रास सहन करायला जमत नाही तो क्षण असतो?
कि त्याग करण्याची तयारी नसायचा पुरावा असतो…
दोन जीवांची घालमेल असते?
कि कोणा एकाचं तडफडण असतं,
पुन्हा एकदा नव्याने सुरवात असते?
कि आठवणींवर जगायची तयारी असते,
ब्रेकअप म्हणजे नक्की काय असतं?





Manacha khel marathi kavita

किती छान असतो न हा खेळ मनाचा,
स्वप्नांचा आधार घेऊन हवेत भरारी मारण्याचा
किती छान असतो न हा खेळ मनाचा,
तू मजा आहे म्हणत स्वप्नात हरवण्याचा
किती छान असतो न हा खेळ मनाचा,
तुझ्या माझ्या अबोल प्रीतीचा
किती छान असतो न हा खेळ मनाचा,
मी करत आलेल्या एकतर्फी प्रेमाचा
किती छान असतो न हा खेळ मनाचा,
तू जवळ नसलास कि तुला अनुभवायचा
किती छान असतो न हा खेळ मनाचा,
सत्यात न उतरणाऱ्या स्वप्नाचा
किती छान असतो न हा खेळ मनाचा,
तू मजाच म्हणून मनाला समजावयाचा
खरच खूप छान असतो रे हा खेळ मनाचा,
सत्य माहित असूनही मनालाच फसवण्याचा.. मनालाच फसवण्याचा !!!!!!!



Tuzi athavan yetach rahate

तुझी वाट पाहताना दिवस संपतात,

पण वाट पाहणं संपत नाही.

आयुष्यावरी ल तुझी छाप पुसून... टाकणं

मला अजूनही जमत नाही.

का तुझा सहवास दरवळत राहतो आजही ?

का खोलवर झालेल्या जखमा बुझता बुझाता

पुन्हा वाहायला लागतात ?

का ती वेदना नको असतानाही हवीशी वाटत

राहते ?

का तुझी आठवण नको असताना येतच

राहते ??



love quotes in marathi ( prem kase aste, ek chote udharan)

दोन फुलपाखरे प्रेमात पडली होती...एके दिवशी ते लपा-छपि खेळत होते, खेळताना .......


मुलगा फुलपाखरू :- चल एक छोटासा नवीन खेळ आपल्या दोघांच्यात ....

मुलगी फुलपाखरू :- हो चालेल !!

मुलगा फुलपाखरू :- आपल्या दोघांमध्ये, सकाळी सकाळी ह्या समोरच्या फुला मध्ये जो सर्वात प्रथम बसलेला असेल तो दुसऱ्या पेक्षा जास्त प्रेम करतो ....

मुलगी फुलपाखरू :- हो चालेल !!


दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी, मुलगा फुलपाखरू त्या फुलाच्या जवळ येऊन उभा राहिला आणि ते फुल उमलण्याची वाट पाहू लागला जेणेकरून तो तिच्या आधी त्या फुलामध्ये बसेल आणि तिला दाखवून देईल कि त्याचे तिच्यावर खूप खूप प्रेम आहे ....


थोड्याच वेळात फुल उमलले ........ पाहतो तर काय ????????????

.

.

.

.

ती मुलगी फुलपाखरू त्या उमलेल्या फुला मध्ये मरून पडली होती ........ कारण, रात्रभर ती त्या फुला मधेच राहिली होती फक्त ह्या वेड्या अपेक्षेने कि सकाळ होताच आणि ते फुल उमलताच ती त्या मुलगा फुलपाखरू कडे आनंदाने झेप घेईल आणि त्याला दाखवून देईल कि ती त्याच्यावर जीवापाड प्रेम करते ते ..........



college chi khas maitrin (best friend in college in marathi)

कॉलेज मध्ये आपल्या खूप मैत्रिणी असता

कॉलेज मध्ये आपल्या खूप मैत्रिणी असतात,
पण जी आपल्याला पाहुन सुंदर smile देते ना,
ती आपली खास मैत्रीण असते.



जी आपल्याला रोज SMS करते,
आणि जिच्या SMS la आपल्याला पण छान Reply द्यावसा वाटतो ना,
ती आपली खास मैत्रीण असते.



जिच्याशी बोलताना आपल्याला खूप मजा येते,
पण तिच्या नजरेला नजर देऊन आपण कधी बोलू शकत नाही,
ती आपली खास अशी मैत्रीण असते.



तिची पण अवस्था काही निराळी नसते,
कारण, ती पण आपल्याशी बोलणे टाळत असते ना,
ती आपली खास अशी मैत्रीण असते.



ती कधी कॉलेजला नाही आली तर,
जीची आपल्याला विचारपूस करावीशी वाटते ना,
ती आपली खास मैत्रीण असते.



कधी मित्रमैत्रिणींशी बोलताना जी आपली
बाजू घेऊन बोलते ना,
ती आपली खास मैत्रीण असते,



जिच्या प्रेरणेमुळेच आपल्याला अशी कविता करावीशी वाटते,
आणि जी आपल्या अशा कवितांना नाही आवडल्या तरी,
छान होती... अशी एक दाद देते ना,
ती आपली खास अशी मैत्रीण असते.


Online love story in marathi (online prem chi kahani)

काय सांगू मी तुम्हाला


काय सांगू मी तुम्हाला मला online प्रेम झाल,
हृदयातील मन माझं facebook वरती आल.


तोंडाने भावना व्यक्त करायचो ते आता विसरले,
सारे शब्द जणू key board वरती घसरले,

मी म्हटले मनाला चल थोडा वेळ जाऊ,
मन म्हणाले मला, ती येते का ते पाहू.

तू गेलास कि माझे शब्द तिथे कोण पोहोचवेल,
अन मी नसलो इथे, तर तुला कोण सुचवेल.

आपण एक काम करू एकत्रच राहू,
ती येण्याची वाट दोघ आतुरतेने पाहू.

५ होते वाजले ती येण्याची झाली वेळ,
मन म्हणाले मला बंद कर तो पत्त्यांचा खेळ.

ती आली, मला म्हणाली आहेस का रे विशाल,
मन म्हणाले मी तुझी वाट पाहतोय खुशाल.


ती म्हणाली हाई, कसा आहेस, आता तू बोल,
मी म्हणालो मनाला आता तूच टाक झोल.

खूप वेळ झाला अन भरपूर मारल्या गप्पा,
मन तिथेच होते पुढे जायीनाच टप्पा.

मन म्हणाले मला तीला भेटायला सांग जरा,
मी म्हणालो आत्ता नको वेळ येऊन देत बरा.

ती म्हणाली मला बाय, वाजले आहेत आठ,
मन म्हणाले मला तू का करतोस असा थाट


असंच रोज आमचं ( माझं आणि माझ्या मनाचं) भांडण होत राहिलं,
खर सांगा मित्रांनो तुम्ही कधी online प्रेम पाहिलं ?



Emotional love kavita in marathi


बोल ना रे काही तरी…
शी बाबा……आज काहीच का बोलत नाहीस…
हळूच मी त्या डोळ्यांकड़े पहिल…
चेहरयावर हास्य मग राहिले…



तिला कुठे माहित…
बोलक्या ओठांचा
आज अबोलाच होता…
आवाजासाठी चक्क आतुर होता…



तीच हसन…ते लाजन…
तीच रुसन..तर कधी भांडन…
तिचे प्रश्न…तीचे उत्तर…
कधी सवांद… तर कधी वाद…
कोण होती ती….???



नव्हती रक्ताची… ना नात्याची….
परी होती ती या मनाची…
स्नेहच्या बंधाची…. अंतरीच्या गाभ्याची…
आठवणींनच्या काही गोड क्षणंची…



होती ती श्रावण सर…
वाळवंटातही ओले चिम्ब करणारी…
की होती ती काजवा…
अंधार्र्या आयुष्याची…



रेशीम गाठिंचा बंध होता…
ह्या दोन खुळ्या मनांचा…
मैत्रीचा की प्रेमाचा…
हा प्रश्न नव्हता मनांचा…




तीच्या सोबतचा वेळ
क्षणात संपून जाई…
परत भेटीची ओढ़
आता अंतरी राहून जाई…



मी स्वर्ग नाही पहिला…
पण तीच्या सोबतचा
प्रत्येक क्षण ......
मला स्वर्गाप्रमाणे भासला!!



Also check

Marathi poems
Marathi kavita
Marathi song lyrics
Previous Post
Next Post

post written by:

Hi friends, welcome to the Apalimarathistatus.in , We started Apalimarathistatus.in as a passion, and now it’s empowering more than 900K+ readers globally.

0 comments: